Skip to main content

प्रबोधनाची भयानक कमतरता

प्रबोधनाची भयानक कमतरता.
साभार - गोविंद पानसरे .

तत्त्वज्ञानहीनता ही मूल्यहीनतेचा पाया आहे. कुणालाही कोणतेच तत्त्वज्ञान नको आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांतील तत्त्वज्ञानाचे वर्ग बंद पडत आहेत. प्रगत-अतिप्रगत तंत्रज्ञान हेच समाजाचे सर्व प्रश्न सोडवेल, असे सिद्धांत मांडले जात आहेत. केंद्र सरकारने नेमलेल्या उच्चशिक्षणात काय शिकवावे, यासंबंधी शिफारस करण्यास बिर्ला-अंबानी या दोन नफेखोर भांडवलदारांची कमिटी नेमली होती. तिने कोणतेही समाजशास्त्र किंवा मानव्यशास्त्रे शिकवूच नयेत, अशी शिफारस केली. ती माणसाचा सारासार विवेक मारूनटाकणारी आहे. एकदा विचार व विवेक मारला की लोकांना अंधश्रद्धाळू बनविणे सोपे. चंगळवादाने व चंगळ करायला मिळेल या अपेक्षेने मनुष्य किती हीन झाला, हे समजल्यावर एकप्रकारची उद्विग्नता आणि हा समाज कसा सावरणार, असे एक प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. समाजातील मूल्यहीनतेबद्दल वाटणारी चिंता अधिक जोरकसपणे त्रास देऊन गेली.
थोडे थांबून विचार केल्यानंतर हे जाणवले की नुसती चिंता करून काय होणार.? संत कबीर याने सांगून ठेवले आहे की, 'चिंतासे चतुराई घटें..' समाजाच्या अशा अवस्थेत जास्त चतुराईची गरज आहे. ही घटना पाहून समाजातील अघोरी प्रथा व अंधश्रद्धाविरोधी अति कठोर कायद्याची किती गरज आहे, हे आणखी एकदा अधोरेखित झाले.
कुणीतरी 'बच्ची बाई' नावाची मांत्रिक देऊळ बांधण्यासाठी सात महिलांचा बळी देण्याचे ठरवून लोकांना फसवते व सुखप्राप्तीच्या आशेने स्वत:ची आई, बहीण आणि मावशी यांना कुणीतरी मांत्रिक बाई, त्या चेटकिणी आहेत, त्यांचा बळी दिल्याशिवाय तुमच्या घरात सुख नांदणार नाही, असे सांगते काय आणि हा कुणी दशरथ त्यांना बळी देण्याच्या दृष्टीने कामाला लागतो काय, हे सारेच महाभयानक आहे. अशा अघोरी प्रथेविरुद्ध कठोर कायदा हवा, हे निर्विवादच आहे. परंतु तो कायदा व्हावा, यासाठी तब्बल एक तप संघर्ष करणार्याद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना त्यासाठी स्वत:चे बलिदान द्यावे लागले. त्यांची जिवंतपणी तथाकथित धर्माभिमानींनी कुचेष्ठा केली. अशा प्रकारांना आळा घालणार्या्कायद्याच्या मागणीची कुचेष्टा केली. अखेरीस त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतरच असा कायदा झाला. आता तरी दाभोलकरांची कुचेष्टा करणार्यांेनीआपले चुकले होते हे मान्य करावे व या अनैतिक व्यवहाराच्या विरुद्ध जे कोणी उभे राहताहेत त्यांना बळ द्यावे. तथापि हा केवळ कायद्याचा मुद्दा नाही. एकूणच समाजातच मूल्यासंबंधीच्या प्रबोधनाची किती भयानक कमतरता आहे, हे या निमित्ताने जाणवले.
महाराष्ट्र पुरोगामी आहे, असे म्हणणे सर्वांनी त्वरित थांबविले पाहिजे आणि महाराष्ट्राला पुरोगामी करण्याच्या कार्यासाठी व्यापक व सखोल प्रबोधनाचे कार्य चिकाटीने करीत राहिले पाहिजे. एवढेजरी या निमित्ताने महाराष्ट्रातील शहाण्यांना कळाले तरी अशा अनेक घटना आपण नक्कीच रोखू शकू. तत्त्वज्ञानहीनता ही मूल्यहीनतेचा पाया आहे. कुणालाही कोणतेच तत्त्वज्ञान नको आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांतील तत्त्वज्ञानाचे वर्ग बंद पडत आहेत. प्रगत-अतिप्रगत तंत्रज्ञान हेच समाजाचे सर्व प्रश्न सोडवेल, असे सिद्धांत मांडले जात आहेत. केंद्र सरकारने नेमलेल्या उच्चशिक्षणात काय शिकवावे, यासंबंधी शिफारस करण्यास बिर्ला-अंबानी या दोन नफेखोर भांडवलदारांची कमिटी नेमली होती. तिने कोणतेही समाजशास्त्र किंवा मानव्यशास्त्रे शिकवूच नयेत, अशी शिफारस केली. ती माणसाचा सारासार विवेक मारूनटाकणारी आहे. एकदा विचार व विवेक मारला की लोकांना अंधश्रद्धाळू बनविणे सोपे.
(प्रसिद्धी : दैनिक लोकमत रविवार दि. 4 जानेवारी, 2015)

Comments

Popular posts from this blog

चावडी उद्योग मार्गदर्शन केंद्र

२५०+ व्यवसाय, उद्योग, धंद्यांचे मार्गदर्शन / प्रशिक्षण मिळवा मराठीत ------------------------------------------- खास स्वताचा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या प्रत्येक नव उद्योजकासाठी. आपल्या घरच्या घरी लघु उद्...

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ------------------------------------------- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ( www.mced.nic.in ) ही संस्था शासनाच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि उद्योग विभागाच्या आधिपत्याखाली क...

वाया जाणाऱ्या ऊस पाचटा पासुन सुरु केला उद्योग

वाया जाणार्या ऊस पाचटा पासून सुरु केला उद्योग ------------------------------------------- शेतीपूरक उद्योग ही काळाची गरज असल्याचे ओळखून प्रवीण लंगोटे या तरुण अभियंत्याने उसाच्या पाचटापासून ब्रिकेट (कोळस...