वयाच्या १६ व्या वर्षी मी अकरावीमध्ये शिकत होते आणि त्या दरम्यानच माझ्या वडिलांनी माझ्यासाठी चांगले स्थळ आणले. माझं माहेर तालुका जुन्नर आळेफाटा याठिकाणी गाव राजुरी. तर सासर टाकळी हाजी, तालुका शिरुरमधल. खरं सांगायच तर माझा होणारा नवरा हा आत्याचा मुलगाचं. त्याच्यासोबतच माझं लग्न ठरवण्यात आलं आणि माझं लग्न झाल. असं बघायला गेलं तर माझ्या सासरची परिस्थिती बिकट होती. त्यामुळे माहेरचा पारंपारिक व्यवसाय घेऊनच मी सासरी आले. खरं तर मला चप्पल शिवायला माझ्या वडिलांनी शिकवले आणि त्याचा फायदा मला सासरी आल्यावर झाला. परंतु, सुरुवातीची ७ वर्षे कर्जात गेली. त्यातच नवऱ्याला ब्रेन ट्युमर या कर्करोगाने ग्रासले आणि मार्च २००७ साली नवऱ्याचे छत्र हरपले आणि त्यादिवसापासूनच माझी आयुष्याची खरी परिक्षा सुरु झाली. एक एक दिवस नकोसा होऊ लागला. त्यातच माझ्या आईचे देखील निधन झाले. हे संकट दूर होत नाही. तर आमचे जुलै महिन्यात मातीचे घर अचानक कोसळे. आणि खायचे देखील मोठ्या प्रमाणात हाल झाले. एका वेळचा घास देखील मिळणे अशक्य झाले, अशी परिस्थिती आमच्यावर आली. त्यानंतर गावातील लोकांनी निधी गोळा करुन समाजमंदिरात राहण्याची सोय...